सार्वजनिक शांतता भंग करू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी




अफसर शेख


अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार ३ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

  *शस्त्रे बाळगण्यास मनाई*

जिल्ह्यात सभा, महासभा, आंदाेलने व जातीय संवेदनशील वातावरणामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी ३ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे. हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींंना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post